वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूरांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गरीब मजुरांना रोजच भाकरी आणि जगण्यासाठी संघर्षाची लढाई लढावी लागत असल्याचे चित्र वसईत दिसत आहे.
महत्वाची बातमी : धारावीपेक्षा 'या' वॉर्ड मध्ये आहेत अधिक कोविड रुग्ण
वसईच्या गावराईपाडा, मुंबई अहमदाबाद महामार्ग, पेल्हार, संतोषभुवन, नगीनदासपाडा, वालीव, सातिवली यासह आजूबाजूच्या परिसरात हजारो मजूर राहतात. बांधकाम व्यवसाय, रस्त्यांची कामे, खोदकाम अशी रोजंदारीची कामे करुन हे मजूर राहतात. संचारबंदी सुरु झाल्यानंतर मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. पैसा नाही, रेशनकार्ड नसल्याने त्याचा लाभ नाही, त्यातच कोणत्या सामाजिक संस्थेने जेवण दिले तर ठीक अन्यथा उपाशी दिवस ढकलावा लागत आहे. यात लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तसेच घरात कुणी आजारी पडले तर दवाखाने सुरु नसल्याने उपचार कुठे करायचे ही समस्या देखील त्याना सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना कायमचा जावो आणि पुन्हा मजुरीचे काम मिळो या आशेवर येथील हे मजूर जगत आहेत.
येथे सफाई, जंतुनाशक फवारणी होत नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संचारबंदीचे पालन केले जाते, मात्र उकाडा जास्त असल्याने आम्हाला राहत असलेल्या गाळ्याचे शटर उघडून बसावे लागत आहे. त्यात दोन वेळच जेवणही नशिबात नाही. मुलांची भूक देखिल भागत नाही.
मंगल दुबे, रहिवासी, वसई.
Workers struggle for one time meal in Vasai
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.