मला हवी तर अटक करा, मी कायदा मोडलेला नाही - भाई जगताप

संतप्त भाई जगतापांचा सवाल
Bhai Jagtap
Bhai Jagtap

मुंबई: "जगात सर्वाधिक लसी भारतात (india vaccination) तयार होतात. पण भारतातल्या जनतेला त्याचा फायदा नसेल तर काय उपयोग?" असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विचारला आहे. "विरोधी पक्षनेते इतर वेळेस थयथयाट करतात. आता भाजपाचे अनेक लोक सोसायटी मध्ये जाऊन पेड व्हॅक्सिनेशन करत आहेत" अशी टीका भाई जगताप (bhai jagtap) यांनी केली. (you can arrest me i never break the law bhai jagtap)

लोकांच्या जीवाशी खेळू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. "आतापर्यंत एवढ्या लसी आल्या पण असं राजकारण झालं नाही. कधीच कुठल्या लसी संदर्भात असा व्यापार झाला नाही. 2024 पर्यंत हे लसीकरण तुम्हाला चालू ठेवायचे का?" असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

Bhai Jagtap
महावसूली आता ३०० कोटीवर? अनिल परब यांच्यावर मनसेचा प्रहार

"मला अटक करा, प्रश्न विचारून आम्ही कायदा तोडलेला नाही. आम्ही एका वाक्यात फक्त प्रश्न विचारलाय इतर देशात लस का पाठवली? आणि का विकली?" असे भाई म्हणाले. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदित्य ठाकरेंना मंत्री असून ट्विट करावं लागलं, असं भाई जगताप म्हणाले. थयथयाट करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे. "कोकणात नेमकं काय बघायला गेले होते? कोकणात पडलेली झाड बघायला गेले होते?" असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com