नांदेड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम झाला. फळे व भाजीपाल्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. अशावेळी कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विस्तार कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती.
लॉकडाउनच्या कालावधीत (२४ मार्चपासून) नांदेड जिल्ह्यात फळे व भाजीपाला यांच्या खरेदीस ग्राहकाला प्रचंड त्रास होऊ लागला होता. तसेच शुद्ध, स्वच्छ व सुरक्षित भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित विविध विस्तार कार्यक्रम सुद्धा केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार तत्काल रद्द करण्यात आले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडने कृषी विभाग, आत्मा तसेच जिल्हा व पोलीस प्रशासन आणि विविध शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने तसेच तसेच आकाशवाणी नांदेड, प्रसार माध्यमे व सामाजिक माध्यम आदी उपलब्ध तंत्रज्ञानाचा परीपूर्ण वापर केला. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फतचे सर्व कृषि विस्तार कार्यक्रम यशस्वीपणे राबवणे शक्य झाले आहे.
हे देखील वाचा - रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...
या कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकरी बांधवांशी संवाद सतत चालू ठेवल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागला. लॉकडाउनमधील या सर्व कार्याची व उपक्रमांची नोंद भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीतर्फे घेण्यात आली. त्यांच्या मानाच्या ई-पुस्तकात कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडला महत्वाचे स्थान देण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी दिली.
येथे क्लिक कराच - नांदेडमध्ये दुचाकीस्वारांनी भरदिवसा महिलेला लुटले, गळ्यातील गंठण लंपास -
ऊस पीक खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी युट्युब लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उसाला हुमणी लागल्या काय करावे? उसाला खोड कीड लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, उसावर काजळी येत असल्याची काय करावे? उसामध्ये वाळवी लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, तणनाशक कोणते वापरावे आदींविषयी डॉ. बी. व्ही. भेडे यांनी मार्गदर्शन केले.
हे वाचलेच पाहिजे - मियावाकी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.....कोण म्हणाले ते वाचा -
शेतकऱ्यांनी केले शंकांचे निरसन
युट्युब लाईव्ह कार्यक्रमामध्ये नांदेडसह हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चॅटींगद्वारे तज्ज्ञांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे प्रा. डॉ. बी. व्ही. भेडे आदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.