राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दिवसाच्या आत मदत करण्याचे यापूर्वी जाहीर केले होते.
नांदेड - राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दिवसाच्या आत मदत करण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. परंतु, गारपिटीची मदत मिळाल्याचे सांगणारा राज्यातील एकही शेतकरी भेटला नाही. मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात, दुसरे काहीच नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे रविवारी ‘एमएसपी गॅरंटी’ (किमान आधारभूत किंमत) परिषद झाली. त्यानिमित्त पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, ‘यापूर्वीच्या गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारीचे नुकसान झाले. आताच्या गारपिटीत केळी, टरबूज, द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झाले. नुकसानभरपाईबाबत विमा कंपन्यांचा सावळा गोंधळ सुरू आहे. हवामानावर आधारित दिलेल्या पीक विमा योजनेच्या धोरणात बदल आवश्यक आहे. देशात २३ पिकांना हमीभाव जाहीर झाला आहे. यात दूध, फळपिके आणि भाजीपाल्याचा समावेश करावा.
दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या भागात अवकाळी पाऊस, गारपीट सुरु आहे. यापूर्वी आणि आताही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान पाहणीसाठी मंत्री येतात, पण भरपाई काही मिळत नाही, हे वास्तव आहे. सरकारने मदत केली नाही तर स्वाभिमान शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
- राजू शेट्टी, माजी खासदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.