अतिवृष्टीनं पीक मातीमोल, लेकानं मृत्यूला कवटाळलं; १२ तासात वृद्ध वडिलांनी सोडले प्राण, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Nanded News : अतिवृष्टीने शेतातलं उभं पीक मातीमोल झाल्यानंतर तरुण शेतकऱ्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं. तरुण मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं वृद्ध वडिलांचंही १२ तासात निधन झालं.
अतिवृष्टीनं पीक मातीमोल, लेकानं मृत्यूला कवटाळलं; १२ तासात वृद्ध वडिलांनी सोडले प्राण, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Updated on

गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं पूरस्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यामुळे झालंय. नांदेडला गेल्या आठवड्यात पावसानं झोडपलं. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे खराब झाल्यानं तरुण शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं. शेतातल्याच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तरुण मुलानं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं वडिलांनीही १२ तासात प्राण सोडले. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा इथं ही घटना घडलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com