तेवीस हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा......कुठे ते वाचा

टॅंकर.jpg
टॅंकर.jpg

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात टंचाइची तिव्रता वाढली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरवात झाली होती. मागील महिन्यात सात टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता. यात आता भर पडून सात गावे व १७ वाड्यांवर वीस टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच १३० गावात टॅंकरसाठी व टॅंकर व्यतिरीक्त  १४२ ठिकाणी अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाइ कक्षातून देण्यात आली.

मागच्या आठवड्यात होते सात टॅंकर 
जिल्ह्यात मे महिन्यात नांदेड तालुक्यातील एक व किनवट तालुक्यातील एक अशा दोन गावासह मुखेड तालुक्यातील पाच वाड्यांवर एकूण सहा हजार ८२६ नागरिकांना सात शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासोबतच ५७ गावातील ६८ ठिकाणी खासगी कुपनलिका तसेच विहिरींचे अधिगृहण करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रोहिण्या नक्षत्रात पावसाचे आगमण झाले नसल्याने टंचाइत वाढ झाली.

वीस टॅंकरने पाणी पुरवठा सुरु
सध्या नांदेड व कंधार तालुक्यातील प्रत्येकी एक, किनवटमधील तीन व माहूरमधील दोन अशा एकूण सात गावात तर कंधारमधील चार, मुखेडमधील १३ अशा एकूण १७ वाड्यावर टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात आठ टॅंकर शासकीय तर १२ खासगी टॅंकरचा समावेश आहे. यासोबतच १३० गावात टॅंकरसाठी १२ व टॅंकर व्यतिरीक्त ११९ अशा एकूण १४२ ठिकाणी खासगी विहीर व कुपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

२३ हजार नागरिकांना पाणी पुरवठा
जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. मागीलवर्षी पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षीक सरासरीच्या १०६ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे जलस्त्रोत भरले होते. तसेच भूगर्भातील जलसंचय वाढल्याने टंचाईची दाहकता यावर्षी अद्याप जाणवली नाही. परंतु, मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून टंचाई जाणवु लागल्याने टॅंकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. यात जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील दोन, कंधार तालुक्यात चार, मुखेडमध्ये नऊ, किनवट तालुक्यात तीन व माहूर तालुक्यात दोन अशा २० गावात टॅंकर सुरु झाले आहे. जिल्ह्यात एकूण २३ हजार ३३३ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षातून देण्यात आली.

मागीलवर्षी सुरु होते १६१ टॅंकर
मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुखेड, कंधार, लोहा, नांदेड, देगलूर, नायगाव या तालुक्यांसह नांदेड, अर्धापूर व लोहा शहरात टॅंकरणे पाणीपुरवठा करावा लागला होता. यात टंचाइच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर ३४ कोटींचा खर्च झाला होता. यात ग्रामीण व नागरी भागात एकूण १६१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या अधिक म्हणजेच १०६ टक्यांनुसार एक हजार १३ मिलीमीटर झाल्यामुळे यंदा टंचाई कमी जाणवत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com