कोरोनाच्या संकट काळामध्येही आहेत नव्या संधी, कोणत्या? ते वाचा

Nanded News
Nanded News

नांदेड : बुद्ध पौर्णिमेनिमित्त तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषद मंगळवारपासून (ता.पाच मे) सुरु झेली असून, शुक्रवारी (ता.सात मे) समारोप होत आहे. यात आठ देशातील बौद्ध भिक्खू धम्म प्रवचन देत आहेत. बुधवारी सायंकाळच्या सत्रात ‘कोरोना संकट काळातील उद्योग आणि व्यवसायाचे विश्लेषण’ या विषयावर डॉ. कांबळे आणि बिजनेस कोच विनीत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.  

बिझनेस मॉडेल बदलतील. काही बिझनेस वाढीला लागतील. जसे ‘वर्क फ्रॉम होम’, ‘होम ट्युशन’, ‘ऑनलाईन मार्केटिंग’, ‘डेटा सेंटर’, ‘क्लाऊड कॉम्पुटिंग’, ‘आर्टिफिशिअल इंटिलिजिअन्स’ अशा प्रकारचे बिझनेस वाढीला लागणार आहेत. महत्वाचे म्हणजे ‘डोर टु डोर’ डिलिव्हरीचे बिझनेस हे खूप चांगल्या प्रमाणात चालतील. लोकांच्या घरी जाऊन तुम्ही भाजीपाला देता, हा खूप चांगला बिझनेस होऊ शकतो.

गरजेच्या वस्तू घरापर्यंत पोचवून देणे हे बिझनेसच साधन होऊ शकते. त्यासोबतच फॅशन टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ई कॉमर्स आहेत यांची जोड घालून देता येईल. तो सुद्धा नवीन बिझनेस डेव्हलप होणार असल्याचे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले.

काही दिवसात ‘फाईव्ह जी’ येणार आहे, तसेच दोन तीन वर्षात ‘सिक्स जी’ सुद्धा येईल. याच्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्यामुळे होम इंटरटेन्मेन्ट आणि मोबाईलवर छोट्या छोट्या मुव्हीज व्हिडिओ क्लिप्सच्या स्वरूपामध्ये इंटरटेन्मेन्टचा खूप मोठा बिझनेस डेव्हलप होणार आहे. यावर लक्ष  द्यायला पाहिजे. जशी टेक्नॉलॉजी वाढत आहे, आता होलोग्राफीक्स इमेजेसमधून आपल्या प्रोडक्टचं मार्केटींग करणं सुरु होणार आहे.  त्यासाठी आतापासून तयारी करा, असेही डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.  

मात्र, कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा याचे काही तत्व पाळायला पाहिजेत. जसे बुद्ध धम्मामध्ये सम्यक आजीविका असून ते अष्टांगिक मार्गातील एक मार्ग आहे. कुठला बिझनेस करायचा कुठला नाही करायचा, ते दुसऱ्यांना अपायकारक असू नये अशा प्रकारचेच बिझनेस करायला पाहिजे. शेवटी पैसा कमावणे हाच माणसाचा ऊद्देश नसतो. चांगले जीवन जगणं, आपल्या जीवनाला काही अर्थ असणे यालाही तेवढेच महत्व आहे. हे कितीही संकट मोठे असले तरी यातून आपण बाहेर येऊ शकतो.  

दोन वर्षात अर्थव्यवस्था उभारी घेईल
आज सर्व प्रकारचा बिझनेस डाऊन आहेत. एक दोन वर्षात अर्थव्यवस्था उभारी घेईल. या काळात शांत डोक्याने राहिलो आणि थोडासा ताण वाढल्यामुळे मेडिटेशन आपण करायला लागलो तर त्याचाही फायदा होतो. चांगल्या विचाराने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, त्याच्यामधून चांगलं प्लॅनींग तयार होऊ शकतं. ते आपल्याला नक्कीच बिझनेसमध्ये मदत होणार आहे. असा थोडासा आर्थिक बाजू आणि थोडासा धम्माची बाजू अशी मिळवणूक केली तर त्यामधून चांगलं प्रॉडक्ट बाहेर येऊ शकते. त्याचा फायदा मनुष्य जातीला फायदा होऊ शकतो.    

अॅग्रो प्रोसेसिंगला मोठा स्कोप
सर्वात महत्वाचे म्हणजे आता चांगलं अन्न सर्वांना लागणार आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाजीपालाकडे लोकांचा भर जाणार आहे. त्यामुळे अॅग्रो प्रोसेसिंगकडे खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे. अॅग्रो प्रोसेसिंगला महाराष्ट्र आणि भारतात खूप स्कोप आहे.  
- डॉ. हर्षदीप कांबळे

लहानपणापासून बिझनेसची भिती
नोकरी करणाऱ्या लोकांना बिझनेसमध्ये येण्याची भीती का वाटते? लहान असल्यापासून आपल्याला बिझनेस म्हणजे नुकसान, कर्ज, अश अनेक गोष्टी सतत ऐकत असतो. त्यामुळे आपल्या मनात बिझनेस बद्दल भीती बसलेली असते. बिझनेस करताना नॉलेज, स्किल्स आणि अॅटीट्यूड या तीन गोष्टी असतील तर यशस्वी होऊ शकतो.  
- विनीत बनसोडे (बिझनेस कोच)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com