Video - साहित्यिक पुस्तकांच्या विक्रीमध्ये होतेय वाढ, कशामुळे?

File photo
File photo

नांदेड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देश २४ मार्च रोजी लॉकडाउन करण्यात आला. परिणामी, सर्वप्रकारची दुकाने, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये दोन महिन्यांपासून बंदच आहेत. त्यामुळे सर्वजणच घरीच बसून असल्याने प्रत्येकजण वेगवेगळे छंद जोपासण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

सोशल मिडियाच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती दिवसेंदिवस कमी होत आहेत. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वचजण सोशल मिडियावर तासनतास रहात असल्याने वाचनासोबतच एकमेकांसोबतचा संवादही हरवत चालला आहे. याचा परिणाम मुलांच्या जडणीघडणीवर होत असून, त्यांच्यामध्ये हिंसकवृत्तीचे प्रमाणही वाढत आहेत. 

असे जोपासलेत छंद
शाळा-महाविद्यालये तसेच उद्योग-व्यवसाय बंद असल्याने बहुतेकजण घरामध्येच बसून आहेत. त्यामुळे अनेकांनी आपापले छंद जोपासले आहेत. काहींनी वाद्य वाजविण्याचे तर कोणी गायन करण्याचा छंद घरामध्येच जोपासला आहे. शिक्षकांनी विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले. काहींनी अर्धवट राहिलेले लेखन पूर्ण केले तर काहींनी रोजच्या धावपळीमध्ये लिखाणाला वेळ मिळत नसल्याने नव्याने लिखाणाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनीही अभ्यासासोबतच गोष्टींची, ऐतिहासिक तसेच साहित्यिक पुस्तके वाचण्याला प्राधान्य दिले आहे.

लॉकडाउनमुळे रुजतेय वाचन संस्कृती 
लॉकडाउनमुळे तोटाही झाला आणि तितकाच फायदाही झाला आहे. तोटा यासाठी की बाजारपेठा बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी त्यांची उपासमार होत आहे. तर फायदा असा की, वर्दळ कमी झाल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग काहीप्रमाणात का होईना टाळता आहे. तसेच सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे दुर्मिळ झालेले जुन्या पारंपरिक खेळांना उजाळा मिळाला. त्यामध्ये चंपोलपानी, सापशिडी, कॅरम, पत्त्यांमध्ये लाल सत्ता, जोडी लावा, रम्मी आदींसारख्या खेळांचा समावेश आहे. शिवाय लुप्त होत चाललेल्या वाचन संस्कृती जोपासण्यालाही लॉकडाउनमध्ये चालना मिळालेली आहे.

साहित्यिक पुस्तकांना वाढली मागणी
शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शिकवणीवर्गही बंदच आहेत. तसेच पुस्तकांचीही दुकाने दोन महिन्यांपासून बंदच आहेत. परंतु, चौथ्या लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने पुस्तकांची दुकाने उघडण्यात आली आहे.  नवनवीन साहित्य वाचनापासून दुरावलेल्या वाचकांनी दुकाने उघडताच आपली आवडीची वाचनीय, प्रेरणादायी पुस्तके खरेदीला एकच गर्दी केली. त्यामुळे अभ्यासाची पुस्तके जरी विकली जात नसली तरी, साहित्यिक पुस्तकांची विक्री समाधानकारक होत असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले आहे.

 

साहित्यिक पुस्तकांना मागणी
चौथ्या लॉकडाउनमध्ये पुस्तकांची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे अनेक वाचकांनी पुस्तक खरेदीसाठी गर्दी केली असून साहित्यिक पुस्तकांची विक्री सध्या समाधानकारक आहे. 
- उमेश कस्तुरे (पुस्तक विक्रेते, नांदेड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com