खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी का व्यक्त केली भीती...

खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रभर पसरला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणित होणारी वाढ ही लक्षणीय असल्याने नांदेड जिल्ह्यातील जनतेने स्वतःची काळजी घेऊन आपल्यासाठी दिवस - रात्र कार्य करणाऱ्या आरोग्य, पोलीस, महसूल विभागासह मीडियाला सहकार्य करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. तसेच भाजपाच्या ग्रामीण भागातील व जिल्हा पातळीवरील सर्वच कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी वंचितापर्यत अन्न धान्य पोहचवून उपासमार होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सामाजिक कार्याची बांधीलकी जपावी, असे आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले आहे.

पंतप्रधान सहाय्यता निधीस ८६ लाख सुपूर्द 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाची महामारी थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील व महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपआपल्या परीने जिल्हास्तरावरून निधीचे संकलन करीत पंतप्रधान सहाय्यता निधी जमा केली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील जनतेने व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तब्बल ८६ लाख रुपयाचा पंतप्रधान सहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या  मुकाबल्यासाठी आणि सामान्य जनतेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस काम करणारे आरोग्य विभागाचे, पोलीस, महसूलचे अधिकारी, कर्मचारी आणि मीडियाचे प्रतिनिधी हे जनजागृती करून या महामारीचा फैलाव थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

नांदेड रेड झोनच्या उंबरठ्यावर
कठीण परिस्थितीमध्ये ही शासनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे संरक्षण करणे, ही आपलीही जबाबदारी व कर्तव्य असून यात स्वताःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्यांना सहकार्यपर सहानुभूती प्रत्येकाने दाखविणे आवश्यक तर आहेच पण त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्याची परिस्थिती नाजुक होत चालली असून दिवसागणित वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असुन आता आपण रेड झोनच्या उंबरठ्यावर असल्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विनाकारण बाहेर न फिरता घरीच राहून कोरोनाला हरवण्याचे कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

सामाजिक बांधिलकी जपावी
भाजपाच्या लोकप्रतिनिधी, आजी - माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तीप्रमुख यांच्यासह स्थानिक स्तरावरील कार्यकर्ते गरजू लोकांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवटच्या घटकापर्यंत धान्यपुरवठा करण्याचे काम चालू आहे. अजूनही काही घटक धान्यापासून वंचित असतील तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या महामारीत भूकमारीने कुणाचा बळी जाऊ नये, याची दक्षता घेत अन्नधान्याचा पुरवठा आपल्या स्तरावरून करावा आणि कोरोनाला हरवण्यासाठी योगदान देत सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहनही खासदार चिखलीकर यांनी केले आहे.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com