कोल्हापूर - अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३०३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. आज पर्यंत एकूण ६७५४ जणांचे अर्ज आले आहेत. शुक्रवार (ता.१४) पर्यंत पहिल्या भागातील अर्ज करण्याची मुदत आहे.
अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार (ता.७) पासून सुरवात झाली. प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा गुरुवार (ता.१३) पर्यंत असणार आहे. शुक्रवारी (ता.१४) पासून दुसऱ्या टप्प्याला सुरवात होईल. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज, शुल्क आणि अर्जामध्ये प्राथमिक माहिती द्यायची आहे. आज या पद्धतीने सुमारे ३०३२ अर्ज प्राप्त झाले.
गेल्या दोन दिवसांत एकूण ६७५४ विद्यार्थ्यांनी आर्ज केले आहेत. याबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यासाठी के.एम.सी महाविद्यालयात तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे, मात्र आज अात्तापर्यंत एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज लवकारत लवकर भरण्याची सूचना समितीने केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.