बेळगाव - जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जुलै महिन्यांत एका दिवसांत सरासरी दोघांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यांत कोरोनाचा शिरकाव झाला. पण, एप्रिल ते जून या दरम्यान केवळ एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. परंतु, 1 ते 30 जुलै या दरम्यान तब्बल 65 जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन शिथिलसह परराज्यामधील व्यक्तींना राज्यात प्रवेश दिल्यांतर जून महिन्यांत बाधितांचा आकडा वाढला होता. पण, या दरम्यान मृत्यूची नोंद नव्हती. परंतु, एक जुलैला अथणी तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील दुसरा कोरोना बळी ठरला. पण, त्यानंतर मृतांची संख्या वाढत गेली. जुलै महिन्यांत 65 जणांचा बळी गेला आहे. यावरून एका दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसते.
जिल्ह्यात 30 जूनअखेरपर्यंत केवळ 324 कोरोनाबाधित आढळून आले होते. परंतु, जुलै महिन्यांमध्ये बाधितांचा उद्रेक झाला. या महिन्यांत बाधितांची आकडेवारी 1 हजार टप्पा ओलांडली. तर, पुढील तीन आठवड्यामध्ये म्हणजे अवघ्या 15 ते 18 दिवसांत 2 हजार आणि 3 हजारावर बाधितांची संख्या पोचली आहे. त्यावरून कोरोनाचा कहर स्पष्ट होतो. केवळ बाधितांची आकडेवारी जुलै महिन्यांत वाढली नाही. त्यासोबत बळीचा आकडा वाढला आहे. 30 दिवसांमध्ये 65 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. पंरतु, प्रत्यक्षात आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पण, त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे वा अन्य आजारामुळे झाला आहे, याचे निदान व्हायचे आहे. अहवाल प्रतिक्षेत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे.
कोरोना बळी
तारीख : बाधितांची वाढत गेलेली संख्या
कोरोना बळींची जिल्हानिहाय आकडेवारी (अव्वल 10)
जिल्हा : कोरोना बळी
संपादन - मतीन शेख
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.