कापलेले भात गेले पाण्यात अन् शेतकरी अडकला संकटात 

heavy rain in belgaum
heavy rain in belgaum

बेळगाव : यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असतानाच परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाक्‍यामुळे भात, भुईमूग, नाचण्यासह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. आधीच लॉकडाउन आणि कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदिल बनला आहे.

सातत्याने पाऊस सुरु असल्यामुळे बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यात शेतातील कापणी केलेल्या भातपिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने भातपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र भात पडल्याने पाणी जाण्यास बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसत आहे. पावसात भिजल्यामुळे भात काळे पडत असून उत्पादनातही घट होण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यात भुईमूग पीक भुईसपाट झाले आहे. 

जिल्ह्याच्या विविध भागांत चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके, भाजीपाला, फुलांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे भातकापणीही करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावेळी मॉन्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होता. मात्र त्यानंतर सातत्याने पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com