कसबा बावडा (कोल्हापूर) - प्रशासनाने कोल्हापूर शहरामध्ये दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी काही नियम लावले आहेत. पण या नियमामध्ये नदीवर पोहण्यासाठी बंदी असूनसुध्दा कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावजवळ सकाळी व दुपारच्या वेळेत पोहण्यासाठी दररोज गर्दी होत असते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसला आहे. ही बाब करवीर पोलिसांना कळताच पोलिसांनी राजाराम बंधाऱ्यावर जाऊन स्पीकरव्दारे पोहणाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नदीत कोणीही पोहायला जाऊ नये व पोहताना सापडल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी यावेळी पोहणाऱ्यांना दिला. ही गोष्ट पोहत असलेल्या तरूणांना समजताच तरूण पटापट नदीपात्रातून बाहेर आले आणि काही वेळात राजाराम बंधारा निरमनुष्य झाला. पण या तरूणांनी पोहण्याची हौस भागवण्यासाठी आपला मोर्चा शेतातील विहरीकडे वळवणार असणार ही गोष्ट नाकारता येणार नाही.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. पण नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला मदत करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मत नागरितांतून व्यक्त होत आहे.
हे पण वाचा - कोल्हापूर ; पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचं निधन
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.