144 कलम लावून आंदोलन टळणार आहे का

Is the movement going to be avoided by imposing Article 144?
Is the movement going to be avoided by imposing Article 144?

कोल्हापूर ः मुंबईत सरकारने 144 कलम लावले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे कलम लावल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मराठा संघटनांना आंदोलन करता येऊ नये म्हणून हे कलम लावले आहे. अशी कलमे लावून मराठा समाजाच्या भावना दडपता येणार नाहीत. सरकारने कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून यातून कायदेशीर मार्ग काढला पाहिजे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहातील दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, ""मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सरकार मराठा आंदोलकांचा रोष टाळू इच्छित आहे. मराठा संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेताच सरकारने मुंबईत 144 कलम लावले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे कलम लावल्याचे सरकार जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात मराठा आंदोलन दडपण्यासाठीच हे कलम लावण्यात आले आहे. मात्र, अशी कलमे लावून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी कायद्याचा अभ्यास करून कायदेशीर तोडगा काढला पाहिजे. यासाठी सर्वप्रथम मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यात याविषयी चर्चा केली पाहिजे. न्यायालयाची स्थगिती असताना त्या निर्णयाचा अवमान न होता कोणत्या सुविधा मराठा समाजाला देता येतील, यावर विचार झाला पाहिजे.'' 

अजितदादांनी पुढाकार घ्यावा 
चंद्रकांत पाटील म्हणाले, ""अजित पवार हे धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणाचा प्रश्‍न हातात घ्यावा. मराठा आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढावा.'' 

सपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com