'लग्न कार्यासाठी पूर्वीचेच नियम ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका'

same rules apply to marriage say kolhapur collector
same rules apply to marriage say kolhapur collector

कोल्हापूर : जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत लग्न, अंत्यविधी या कार्यक्रमांना फक्त 50 ऐवजी 20 जण उपस्थित राहू शकतात. लग्नाला बाहेरील लोकांना उपस्थित राहता येणार नाही, असे चूकीचे व अफवा पसरवणारे संदेश सोशल मीडियावरुन फिरत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. 

यावेळी देसाई म्हणाले, लग्नाबाबत आणि मयताच्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी पूर्वी दिलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सोशल मीडियावरून फिरणारे संदेश हे चुकीचे आणि खोटे आहेत. त्याच्यावर विश्‍वास ठेवू नका, असेही आवाहन श्री देसाई यांनी केले आहे. अफवेच्या संदेशामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना लग्नाला उपस्थित राहता येणार नाही, असेही लिहले आहे. त्यामुळे लोकांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दिलेल्या माहितीनंतर हा संभ्रम दुर होणार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com