जयसिंगपूर : केवळ हुजरेगिरी आणि लाचारी करुन करुन पाशा पटेल यांनी पदे मिळविली आहेत. भाजपच्या नेत्यांना बरे वाटावे यासाठी राजू शेट्टी यांच्यावर टीका करुन आणखी काय पदरात पडते का यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. मात्र, शेट्टींवर बोलण्याची आपली लायकी तरी आहे का याचे किमान आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. कुणाला तरी बरे वाटावे म्हणून जर शेट्टींवर टीका कराल तर कोल्हापुरी हिसका दाखवू असा इशारा, स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी पत्रकाव्दारे दिला आहे.
राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री आडके यांनी पटेल यांचा पत्रकातून चांगलाच समाचार घेतला. पाशा पटेल यांनी शेतकरी हितापेक्षा राजकीय लाभ मिळवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे नाटक केले. राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष असताना शेतकऱ्यांसाठी कोणते ठोस काम केले याचे आधी उत्तर द्यावे. तरच त्यांना शेट्टींवर बोलण्याचा अधिकार आहे. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्तेवर लाथ मारली आहे. सत्तेत असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे मान्य केले.
हे पण वाचा - उपसरपंचच खुर्चीत बसण्यास नकार देतात तेंव्हा...
सत्तेची फळेच चाखायची असती तर त्यांनीही भाजप नेत्यांची पाठराखण केली असती. पण त्यांनी तसे केले नाही. शेतकरी हाच त्यांचा आत्मा आहे. त्यामुळे पाशा पटेलसारख्या स्वार्थी आणि मतलबी नेत्यांची टीका म्हणजे केवळ मनोरंजन आहे. पाशा पटेल यांनी टीका करताना विचार करावा. आपण कोण, आपली लायकी काय हे ओळखावे. अन्यथा, त्यांना माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ताही पुरुन उरेल. चमचेगिरी करुन मिळविलेल्या पदातून शेतकऱ्यांना काय फायदा झाला नाहीच आता त्यांनी टीका करुन आणखी काय मिळते काय यासाठी प्रयत्न चालवला आहे. पण यापुढे शेट्टींवर टीका करताना विचार करावा अन्यथा कोल्हापूर हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.