सोलापूर : होटगी रस्त्यालगतच्या विमानतळवरून विमानसेवेसाठी होत असलेली अडथळ्यांची शर्यत अद्याप संपली नाही. त्यामुळे आता बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 28 हेक्टर जमिनीच्या थेट खरेदीस 30 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांची यादी बनवून त्यांच्याशी चर्चाही पूर्ण झाली असून जमिनीच्या खरेदीनंतर रन-वे व इमारतीच्या बांधकामाला सुरवात होईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले.
हेही आवश्य वाचाच : सोलापुरची विमानसेवा सुरळीत होईना
केंद्र सरकारच्या "उडान' योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सोलापूरचा समावेश झाला. मात्र, मागील पाच वर्षांत सोलापूरची उडानसेवा सुरूच झाली नाही. विमानतळशेजार श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. चिमणी हटविण्याचा आदेश होऊनही अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. दरम्यान, बोरामणी विमानतळसाठी आतापर्यंत 550 हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून वन विभागाला पर्यायी 33 हेक्टर जमीन देण्याचाही प्रस्ताव नागपूरला पाठविण्यात आला आहे. आता नव्या सरकारच्या निर्देशानुसार उर्वरित 28 हेक्टर जमिनीचे संपादन न करता थेट खरेदीच करण्यासाठी निधीचा प्रस्ताव विमानतळ विकास प्राधिकरणने सादर केला आहे. तो प्रस्ताव सद्यस्थितीत वित्त विभागाकडे असून आगामी बजेटमधून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. डिसेंबर 2020पर्यंत बोरामणी विमानतळ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही आवश्य वाचाच : पक्षनेता व विरोधी पक्षनेत्याबद्दल 'या' अध्यक्षांनी केले भाष्य
मुंबईतील जागेअभावी तीन जिल्ह्यांची विमानसेवा बंद
केंद्र सरकारच्या "उडान' योजनेअंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रसह परराज्यातून मुंबईला सर्वाधिक विमाने येतात. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळवरील विमानांना मुंबईत स्लॉट (जागा) उपलब्ध नाही. तर कोल्हापुरातून येणाऱ्या विमानांसाठी फक्त दुपारीच जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानसेवेसाठी विमान कंपन्यांनी नकार दिला असून कोल्हापूरची विमानसेवा विस्कळीत असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण कार्यालयाने सांगितले.
हेही आवश्य वाचाच : अनाथांच्या आरक्षणावर 'कोणी' मारला डल्ला
कारखान्याच्या चिमणीमुळेच "उडान'ला अडथळा
होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरील विमानसेवा "उडान' योजनेअंतर्गत सुरू करण्यास श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रमुख अडथळा आहे. चिमणीचे पाडकाम होताच विमानसेवा सुरू करण्यासंबंधी नियोजन पूर्ण होईल. दरम्यान, बोरामणी विमानतळसाठी उर्वरित 28 हेक्टर जमिनीची थेट खरेदी करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाला नुकताच पाठविला आहे.
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.