सोलापूर : महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून बिलाची रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सोलापूर शहरातून महापालिका अधिकाऱ्यांना व योजनेच्या समन्वयकांकडे 40 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्ण तथा रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासनात वादाचे प्रसंगही उद्भवले. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नियुक्ती करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र, अद्याप त्यानुसार कार्यवाही झालेली नाही.
राज्यातील सर्वच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर उपचाराची रक्कम दीड लाखाहून अधिक झाल्यास अशा रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत लाभ मिळेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सोलापूरसह राज्यभरातील एक हजाराहून अधिक रुग्णालये या दोन्ही योजनांत समाविष्ट आहेत. मात्र, सद्य:स्थितीत सोलापूर शहर-जिल्ह्यातील 41 पैकी अवघ्या नऊ रुग्णालयांतूनच कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यापैकी काही रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अतिरिक्त बिलाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बिलांच्या तक्रारींसंदर्भात नियुक्त समितीने काही तक्रारींचा निपटारा केला आहे. मात्र, वाढत्या तक्रारी पाहून आता शहर व जिल्ह्यासाठी स्वतंत्र ऑडिटर नियुक्त करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही अद्याप ऑडिटर नियुक्ती झालेली नाही. जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तर शहरासाठी महापालिका आयुक्तांमार्फत ऑडिटरची नियुक्ती करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा : बळिराजासाठी खुषखबर ! कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर
तक्रारींचे असे आहे स्वरूप...
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.