कोरोना इफेक्‍टः इथेही काम नाही आणि तिथेही काम नाही : घरीच अडकलेल्या तरूणांची अवस्था 

bekari.jpg
bekari.jpg


मंगळवेढा (सोलापूर)ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागातही धडकी भरू लागली आहे. लॉकडाउन काळात मुंबई व इतर ठिकाणाहून तालुक्‍यात आलेल्या तरुणांना कुटुंबासह मुलाच्या भवितव्याचा विचार करता रोजगारासाठी परतावे लागले आहे. त्यांची अवस्था इथेही काम नाही आणि तिथे कामास सुरूवात नाही अशी झाली आहे. 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची वाढणारी साखळी रोखण्याच्या दृष्टीने लॉकडाउन केले. त्यामुळे मुंबई, कोल्हापूर, ठाणे, पूणे आदी शहरामध्ये रोजगारासाठी गेलेल्या तालुक्‍यातील तरुणाला कंपनी व छोटे उद्योग बंद ठेवल्याने बेरोजगार व्हावे लागले. बसून काय करायचे म्हणून गड्या आपला गाव बरा या भूमिकेतून तालुक्‍यात 11 हजारापेक्षा अधिक नागरिक आपापल्या गावी आपल्या कुटुंबीयांसमवेत परतले. 

परंतु मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै नंतर लॉकडाउनचा कालावधी वाढतच राहिला. तालुक्‍यात रोजगाराची साधने नसल्यामुळे कुटुंबासह ग्रामीण भागातील आई वडिलांचे कुटुंब चालवण्यासाठी पुन्हा मुंबई पुण्याची वाट धरावी लागली. त्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी मुंबई पुणे येथील खाजगी कंपन्या शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी आपली पोटाची उपजीविका भागेल यादृष्टीने रोजगार निर्माण करण्यासाठी परत गेले होते. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणतेही साधन नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे उच्चशिक्षित झालेल्या तरुणांना रोजगारासाठी इतर जिल्ह्यात जाण्याचा मार्ग निवडावा लागतो. 
भविष्यात कोरोनाचा प्रभाव आणखी काही दिवस राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजकीय लोकप्रतिनिधींनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून तालुक्‍यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात अशी प्रतिक्रिया बेरोजगार तरुणांनी व्यक्त केल्या. 
मंगळवेढा परिसर हा जिरायती शेती पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील पूर्व परंपरागत चालत आलेल्या पद्धतीनुसार शेती व कृषी क्षेत्राशी संबंधित कामे केली जात आहेत. अलीकडच्या काळातील वाढती लोकसंख्या व त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कुटुंबातील काही व्यक्तींना अन्यत्र रोजगाराचा पर्याय शोधावा लागतो. मोठ्या शहरात नोकरीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून या भागात आलेल्या अनेक युवकांना आता या महामारीचा विचार न करता घरी बसून थांबणे शक्‍य नसल्याने रोजगार काम उपलब्ध असलेल्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

रोजगार ही सर्वात मोठी गरज 
पोटासाठी बाहेर जावून या तालुक्‍यात आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. तालुक्‍यामध्ये त्यांना उपजिविकेसाठी कुठलेही काम उपलब्ध नसल्यामुळे शासनाने त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लक्ष घालावे. 
- मच्छिंद्र भोसले प्रदेशाध्यक्ष नाथपंथी डवरी गोसावी समाज 

मालवाहनाचा कर्जाचा बोजा वाढला 
कोरोना मुळे ट्रान्स्पोर्ट व्यवसाय बंद करून मंगळवेढ्यास आलो तीन महिन्यानंतर काम धंदा बंद झाल्याने ही भविष्याचा विचार करून परत पुण्याला आलो.अजूनही या व्यवसायात चालक धास्तीने येत नसल्याने निम्याहून अधिक मालगाड्या बसून आहेत.परिणामी वाहनांवरील कर्जाचा बोजा वाढू लागला. 
- सुनिल ढगे, ट्रान्सपोर्ट चालक,भाळवणी (मंगळवेढा)  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com