शुक्रवारचे ग्रहण पाळू नये; वट पूजन 'असे' करा, पंचांगकर्ते मोहन दाते यांचा सल्ला

 Friday eclipse should not be observed Vatpujan can be done
Friday eclipse should not be observed Vatpujan can be done

सोलापूर : शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमेस (ता.5) चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणा प्रमाणे नसून छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत. त्यामुळे नेहमी प्रमाणे सर्व व्यवहार , पूजा ,अर्चा , कुळधर्म कुलाचार करावेत. तसेच यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष वडाचे पूजन करणे शक्‍य होणार नाही म्हणून वडाचे चित्र काढून घरात वटपूजन करावे. शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिली. 
खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रगहण, छायाकल्प चंद्रगहण असे तीन प्रकार आहेत. खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहणात वेदाचे सर्व नियम पाळायचे असतात. पंरतु छायाकल्प चंद्रग्रहणा मध्ये वेदाचे कोणतेही नियम पाळ्याची गरज नाही. गरोदर महिलांनी देखील कोणतेही नियम पाळू नये कारण विरळ छायेतील ग्रहण आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या वचना नुसार छायाकल्प चंद्रगहणाचे नियम पाळायचे नसतात. परंतु जेष्ठ शुध्द पोर्णिमेला ज्यांच्या घरात कुळधर्म कुळाचार आहे. किंवा सत्यनारयणाची पुजा वगरे नेहमी प्रमाणे करता येती. जेष्ठ शुध्द पोर्णिमेला वट पोर्णिमा असती या दिवशी घरातील स्त्रीया वडाच्या झाडाची पुजा करातात मात्र. जरी आता लॉकडाऊ उघडले असले तरी सोलापूरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत असल्याने स्त्रींयानी वडाच्या झाड्याच्या पुजनासाठी घराबाहेर पडू नये. घरात कागदावर वडाच्या झाडाची प्रतिकृती कागदावर काढावी आणि त्याचे पुजन करावे. 

चंद्रग्रहण ही वैज्ञानिक घटना 
डॉ. वीरभद्र दंडे म्हणाले, छायाकल्प चंद्रग्रहण ही वैज्ञानिक घटना असल्याचे आहे. पंचागाप्रमाणे पहिले पूर्ण चंद्र ग्रहण, दुसरे आंशिक चंद्र ग्रहण आणि तिसरे छायाकल्प चंद्र ग्रहण असे तीन प्रकार असतात. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्यच्याध्ये येते तेव्हा चंद्रावर पडणारे सूर्यकिरण थांबून त्यावर पृथ्वीची सावली पडते. त्याला पूर्ण चंद्र ग्रहण असे म्हणतात. चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवर पडत नाही त्यास छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्र ग्रहणापेक्षा कमजोर असते. त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जाते. पूर्ण म्हणजे खग्रास, आंशिक म्हणजे खंडग्रास आणि तिसरे छायाकल्प असे चंद्रग्रहाचे तीन प्रकार आहेत. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडून चंद्रग्रहण दिसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत येतात तेव्हा पौर्णिमा असते. चंद्रग्रहण पौर्णिमेलाच असत; परंतु प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण नसते. चंद्रग्रहणाचे हे दोन प्रकार असतात. खंडग्रास चंद्रग्रहण: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत असल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्र आकाराने लहान असल्याने पृथ्वीच्या परछायेतून परत जाण्यास त्यास जास्त कालावधी लागतो म्हणून ते तासभर दिसते. खंडग्रास सूर्यग्रहण याप्रमाणेच खंडग्रास चंद्रग्रहण गडद किंवा अदृश्‍य होतात. तांबूस लालसर होतो. यामागे पृथ्वीच्या वातावरणामुळे विजू नारा सूर्यप्रकाश कारणीभूत असतो. यावर्षी एकूण चार चंद्र ग्रहणे असून ती चारही छायाकल्प प्रकारची आहेत. 

मानवी जीवनावर परिणाम होत नाही 
डॉ. एस. सी. आडवीतोट म्हणाले, छायाकल्पित चंद्रग्रहणात पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. ही एक परिभ्रमण व खगोलीय प्रक्रिया असून प्राचीन काळापासून ग्रहणाचा अभ्यास केला जात आहे. छायाकल्पित चंद्रग्रहणात चंद्र- सूर्य- पृथ्वी एकच रेषेत काही विशिष्ट वेळेत येत असतात. सूर्याची छाया चंद्रावर पडत असल्याने त्यास छायाकल्पित चंद्रग्रहण असे म्हणतात. भोगौलिकदृष्ट्या यास खंडग्रास असे म्हणतात. अंशतः सूर्याची छाया चंद्रावर पडत असल्याने मानवी जीवनावर कोणतेही परिणाम होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com