गाड्यांच्या देखभालीचे परिपूर्ण तंत्र व संशोधनाचा अभाव 

vehicles.jpg
vehicles.jpg

सोलापूरः दुचाकी व चारचाक्‍यांच्या आयुष्य पंधरा वर्षाचे असताना या वाहनांना मिळणारी परिपूर्ण देखभाल तंत्राचा अभाव पाहता गाड्या विक्री केल्या जातात. प्रत्यक्षात गाडयांच्या देखभालीच्या बाबतीत आवश्‍यक त्या तांत्रिक सेवा व संशोधनाचा अभाव या गोष्टी महत्वाच्या ठरल्या आहेत. 
दुचाकी व चारचाकी गाडी खरेदी केल्यानंतर या गाडीचे आयुष्य आरटीओंच्या नियमानुसार पंधरा वर्षे असताना पाच ते दहा वर्षात गाड्यांचा रिसेलमध्ये विकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या गाड्यांना हवी असलेली सर्व्हिस, नवा लूक व इतर सेवा मिळत नाहीत. 
नविन दुचाकी किंवा फोरव्हिलर गाडी घेतल्यानंतर तीची स्वच्छता व देखभाली अतिशय चांगल्या पध्दतीने लक्ष दिले जाते. या वाहनांना सुरुवातीला काही सर्व्हिसींगच्या सेवा संबंधित एजन्सीकडे देण्याची सोय कंपन्याकडे केली जाते. वर्षभरात गाड्यांची सर्व्हिसिंग संपल्यानंतर विक्रेता व कंपनीची जबाबदारी संपते. गाड्याची देखभाल शास्त्रीय पध्दतीने करणाऱ्या गाडी मालकांना गाडीची देखभाल बराच काळ करता येते. 
गाडी खरेदीनंतर हळुहळू गाडीची देखभालीकडे लक्ष कमी होऊ लागते. केवळ कशीबशी सर्व्हिसिंग नियमित करणे, गाडी धुणे, पुसणे व काही पार्ट बदलणे एवढ्या गोष्टी होऊ लागतात. सुरवातीला दुचाक्‍यामधील बुशिंग खराब व्हायला लागतात. इंजिनचे काम निघाले तर दुचाकी मालक चांगलाच अडचणीत सापडतात. गाडीवर होणारा देखभाल व दुरुस्तीचा खर्च टाळला जातो. आज करू नाहीतर उद्या करू असे म्हणत कमीत देखभाल खर्चात गाडी चालवली जाते. नंतर गाड्यांची अलाईनमेंट खराब व्हायला सुरूवात होते. त्यामुळे गाडी मालकाला मानदुखी असे ही प्रॉब्लेम येतात. 
पाचव्या वर्षानंतर गाड्यांचे रंग खराब व्हायला सुरूवात होते. या गाड्यांच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात सर्व्हिसींगची सेवा मिळत असते पण त्यासाठी खुप अधिकचा खर्च व्हायला लागतो. दहा वर्षापर्यंत ग्राहक गाडी विकण्याच्या निष्कर्षावर येतो. त्याची गाडी देखभालीवर जास्त खर्च करण्याची तयारी नसते. अनेक जण गाडी घरातील इतर सदस्यांसाठी ठेवून देतात. काही जण कमी किमतीत गाडी कुणी गरजूंना विकून टाकतात. विकत घेणारा त्या गाडीवर पून्हा काही देखभाल खर्च करून चालवण्यास घेतो. या पध्दतीने गाडीची विल्हेवाट लावण्याची वेळ दहा वर्षात येते. रंगकामापर्यंत फार कमी ग्राहक पोहचतात. त्या पुर्वी गाडीच विकणे सोपे पडते. रिसेल व्हॅल्यू कोणत्या गाडीची किती आहे यावर गाडीच्या खरेदीपासूनच विचार होतो व रिसेलचा बाजार फार मोठ्या प्रमाणात उलाढाल करणारा आहे. रिसेल बाजारात असलेल्या गाड्यांची वाईट अवस्था असते मात्र त्या चालू स्थितीत असल्याने त्याची विक्री होते. कारण नवी गाडी जादा पैसे देऊन घेऊ न शकणारे ग्राहक मोठ्या संख्येने त्या बाजाराशी जोडलेले आहेत. 

आकडेवारी काय म्हणते 
गाडी रिसेल करण्याचे प्रमाण 90 टक्के 
रिस्टोअरेशन करणारे ग्राहक 5 टक्के 
गाडी स्क्रॅप होण्याचे प्रमाण 5 टक्के 
-------------------------------------- 
आकडेवारी 
सोलापूर आरटीओ खात्याच्या नोंदी 

पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या फोर व्हिलर ः 8216 
पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या दुचाकी गाड्या ः 18 हजार 956 

--------------- 
आरटीओकडे मुदतवाढीसाठी येणाऱ्या गाड्यांची संख्या एक टक्का 
गाडी स्क्रॅप, रिसेल किंवा घरी पडून राहणाऱ्या गाड्यांची संख्या 95 टक्के  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com