सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांमधील खात्याला मिनिमम बॅलन्सची अट लागू केल्यानंतर आता पोस्टाच्या (टपाल) बचत खात्यातही किमान 500 रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी बचत खात्यात किमान 50 रुपये असोवत, अशी अट होती. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास वार्षिक शंभर रुपयांचा दंड करण्याचा निर्णय मोदी सरकारने 12 डिसेंबरला घेतला. पाचशे रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेली बचत खाती काही महिन्यांत बंद होतील, असेही वरिष्ठ अधिकारी सांगू लागले आहेत. दरम्यान, मोदी सरकारने हा निर्णय का घेतला, याबाबत अधिकारीच अनुत्तरीत झाले आहेत.
हेही नक्की वाचा : बळीराजाला फटका ! अवकाळीने नुकसान न झाल्याचा अहवाल
बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडियाचा वापर वाढला आणि प्रत्येकांच्या हाती स्मार्टफोन आला. त्यामुळे टपाल कार्यालये ओस पडल्याचे चित्र असून पोस्टमनची रिक्त पदेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने पोस्टमनने ग्राहकांपर्यंत पोहचून त्यांच्याशी बॅंकिंग व्यवहार करण्याचेही आवाहन केले होते. मात्र, त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर आता टपाल कार्यालयाकडील बचत खात्यात किमान पाचशे रुपये ठेवावेत, असा नियम केल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या निर्णयाबद्दल खातेदारांनी नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी टपाल कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
हेही नक्की वाचा : भाजप सरकारचा आणखी एक निर्णय 'महाविकास'च्या रडारवर
ठळक बाबी...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.