
मंगळवेढा(सोलापूर)ः कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून ग्रामसभाच घेतल्या नसल्यामुळे शासकीय योजनेच्या लाभासाठी ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्यामुळे लाभार्थाला अडचणीचे ठरत आहे. ग्रामसभा ठरावाअभावी या शेतकऱ्यांच्या शासकीय लाभ अडकून पडू लागला.
हेही वाचाः सांगोला तालुक्यातील किंगमेकर सुभाष पाटील
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी अनेक लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या नागरिकाचे नाव ग्रामसभेचा ठरावामध्ये असणे आवश्यक आहे. तो ठराव त्या लाभासाठी पात्र ठरला जातो. जानेवारीमध्ये तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे त्यानंतर ग्रामसभा बंद झाल्या. त्यामुळे 1 मे व 15 ऑगस्टला ग्रामसभा झाल्या नाहीत.
15 ऑगस्टच्या ग्रामसभेतून पुढील वर्षातील कामाचे अंदाजपत्रक देखील ठरवले जाते. हीच निर्यायक ग्रामसभा झाली नसल्यामुळे पुढील वर्षाच्या कामाचे अंदाजपत्रक कसे निश्चित करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सध्या तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या लाभासाठी कृषी खात्याकडील शेततळे, फळबाग, नाडेफ व विहीर योजना, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेच्या लाभासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. याशिवाय गावाचा विकास कामासाठी निधीचा खर्च करण्यासाठी व विकास कामे नव्याने प्रास्ताविक करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव अधिकृत मानला जातो.
गेल्या आठ महिन्यात ग्रामसभा झाली नसल्यामुळे याचा परिणाम गावाच्या विकासावर होत आहे. तशीच अवस्था ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीच्या बाबतीत झाली आहे. पंचायत समिती स्तरावर तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या. नव्याने नियुक्त झालेल्या ग्रामसेवकांनी ज्यावेळी ग्रामसभा होईल तेव्हा बघू अशी भूमिका घेतल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची आणखीनच अडचण निर्माण झाली. चौदाव्या वित्त आयोगातून तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर लाख रुपयाचा निधी शिल्लक असताना केवळ ग्रामसभेची मान्यता नसल्याच्या कारणास्तव हा निधी पडून आहे. त्यामुळेच कोरोनाचे संकट विचारात घेता फक्त ग्रामसेवकाच्या शिफारशीवर या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
योग्य तोडगा काढण्याची गरज
सोशल डिस्टन्सचे पालन करून ग्रामसभा घेऊन कोणत्याही नागरिकांची अडवणूक न होण्याच्या दृष्टीने ग्रामसेवकाने प्रयत्न करावेत. ग्रामसभा घेण्याबाबतच्या गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तात्काळ सूचना देऊन अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्यास सांगणार आहे. ग्रामीण जनतेची अडवणूक केल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल.
- आ.भारत भालके, पंढरपूर-मंगळवेढा
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.