शेतकऱ्यांचा माल येताच उडदाचे भाव हमीभावापेक्षा झाले कमी 

udid.jpg
udid.jpg

पोथरे(सोलापूर) : उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले होते. मात्र शेतकऱ्यांचा उडीद विक्रीसाठी बाजारात आला की, दिड हजार रुपयांनी बाजार उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

यावर्षी करमाळा तालुक्‍यात खरीप हंगामातील उडदाची विक्रमी पेरणी झालेली आहे. पाऊस मध्यम स्वरूपाचा झाल्याने उडदाला उताराही चांगला मिळत आहे. शासनाने उडदाची आधारभूत किंमत सहा हजार रूपये ठरवली आहे. असे असतानाही सुरुवातीला उडीद सहा हजार सहाशे रूपये एक किंटल दराने विकला गेला. 

त्यानंतर पाच सहा दिवसातच उडदाचे बाजार एकदमच कमी झाले असून तो पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किंटल मागे दीड हजार रुपये जर बाजार भाव एकदम कमी होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे. त्यामुळे यामागे व्यापाऱ्यांची संगनमत झाले की काय असा संशय शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. शासनाने याची दखल घ्यावी व शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

शासनाने हमी भावाने खरेदी करावी 
माझ्याकडे पंधरा एकरात उडीद लावला आहे. बाजार कमी झाल्याने माझे किमान एक लाख रूपयाचे नुकसान होणार आहे. शासनाने कमी दराने उडीद खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. 
- राजेंद्र दादासाहेब सरडे शेतकरी करंजे 

व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेऊ नये.

बाजार कमी झाले तरी पैशाची गरज असल्याने माल विकावाच लागणार आहे. आमच्या अडचणीचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेऊ नये. किमान हमीभावाने तरी उडीद खरेदी करावा. 
- गणेश साबळे शेतकरी भालेवाडी  

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com