
सांगली येथील दिघंचीमध्ये १३ वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
esakal
Highlight Summary Points:
दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरावर्षीय स्वराज शिवाजी पुसावळे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
सहामाही परीक्षेतील अवघड पेपरमुळे मानसिक तणाव आल्याने आत्महत्येचे कारण असल्याचा अंदाज.
पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची चौथी घटना; तालुक्यात हळहळ व चिंतेचे वातावरण.
Sangli : दिघंची (ता. आटपाडी) येथील तेरावर्षीय शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वराज शिवाजी पुसावळे (वय १३) असे त्याचे नाव आहे. पंधरा दिवसांतील शालेय विद्यार्थी आत्महत्येची तालुक्यातील चौथी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.