सांगली-कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून चितळे उद्योग समुहाने 1 कोटी 50 लाखांचा निधी देऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
बी. जी. चितळे भिलवडी स्टेशन यांच्याकडून 1 कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर चितळे बंधू मिठाईवाले पुणे यांच्याकडून 50 लाख रूपये पीएम केअर्स फंडासाठी देण्यात आले आहेत. निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीष चितळे, निखील चितळे उपस्थित होते.
श्रीपाद चितळे म्हणाले, राज्य व देशात उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून निधी दिल्या आहे. अत्यावश्यक सेवेशी निगडीत चितळे उद्योग समुह असल्याने प्रशासनाकडून या काळामध्ये संपूर्ण सहकार्य होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी म्हणून चितळे उद्योग समुह सुरू ठेवण्यात आला असून जास्तीत जास्त दुध संकलन करीत आहे. यासाठी उद्योग समुहाचे कर्मचारीही सोशल डिस्टन्सिंग पाळून अविरतपणे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, देशासमोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी चितळे उद्योग समुह पुढे येऊन मदत करीत आला आहे. कोरोनाच्या संकट काळातही चितळे उद्योग समुहाकडून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.