मारहाणीत मृत्यू झालेले चौघे मंगळवेढ्याचे

murder
murder

मंगळवेढा (सोलपूर) : पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या नाथपंथी डवरी समाजाच्या पाच जणांची मुले पळवणारी टोळी समजून रहिनपाडा (ता. साक्री जि. धुळे) येथे ग्रामपंचायत कार्यालयात हत्या केली. या घटनेत तालुक्यातील चौघांचा समावेश असून सुरुवातीला मयताची ओळख पटवण्याचे काम पोलीसांना अवघड होते एकाच्या आधारकार्डवरील पत्त्यामुळे यांचा शोध लागत गेला. मयताच्या गावात या घटनेची खबर प्रथम सकाळ समजली.

पाच मयतामधील दादाराव भोसले यांच्या आधारकार्डावर खवले ता. मंगळवेढा असा पत्ता होता सदरचे गावाचा तालुक्यात बोध होत नव्हता. चौकशी करता खवे येथे या नावाची व्यक्ती आढळून आली प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर या घटनेबाबत कल्पना नसल्याचे सांगितले गावातील तरुण जमा झाल्यावर फोनाफोनी सुरु झाली, गावातील नातेवाईक व ग्रामस्थ भोसले यांच्याकडे घराकडे गोळा होवू लागले तिथेच या पाचही मयताची नावे समजली मयतामध्ये भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, हे तीन खवेचे तर आप्पा श्रीमंत इंगोले हा मानेवाडीचा तर राजू भोसले (रा.गोंदवन ता. इंडी) विजापूरचा असल्याचे समजताच नातेवाईक महिलांनी एकच हंबरडा फोडला गावावर शोककळा पसरली.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे दाखल झाले नातेवाईकाची समजूत काढत याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवित होते. दुष्काळी गाव असलेल्या गावातील या समाजाचे लोक पोटाची उपजिविका करण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रभर भिक्षा मागण्यासाठी फिरत असतात. त्यांच्यावर मुले पळविणारी टोळी म्हणून हल्ला करुन मारुण टाकण्याच्या प्रकाराने ग्रामस्थ देखील भयभित झाले.

वडीलांचे छत्र हरपल्याने आपल्या आई व बहिणींना आधार देण्यासाठी आप्पा हा खवे येथील नातेवाईकाबरोबर भटकंती करून उपजीवीका करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी गेला होता तो आपल्या नातेवाईकांसोबत धुळे जिल्हयात साक्री तालुक्यात भटकंती करत होतकरू तरुणास कसलीही चूक नसताना जीव गमवावा लागला या घटनेने नाथपंथी डवरी गोसावी समाजातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत मारहाणीत दुर्दैवी अंत झालेने मानेवाडी हुन्नुर परिसरावर ही घटना समजताच शोककला पसरली. आ. भालके यांनी या भागातील पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी करुन याबाबतची माहिती जाणून घेतली. या गावापासून काही अंतरावर अन्य नातेवाईक राहूट्या टाकून राहिले असून त्याचे मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

मृतदेहाचे शवविच्छेदन होवून रात्री उशिरा मृतदेह मंगळवेढ्याकडे अंत्यसंस्कारासाठी निघणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली. मंगळवेढ्याहून स्थानिक पोलीस व नातेवाईकही धुळ्याकडे रात्री रवाना झाले. या प्रकाराने तालुक्यात असलेल्या या समाजात घबराटीचे वातावरण पसरले.

सरकारचा वचक नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. भिक्षा मागून जगणाऱ्यांकडे माझे पत्र, पोलीस स्टेशनचे पत्र असताना खात्री न करता त्यांना मारले यातील दोषीवर कडक कारवाई यासाठी विधानसभेत आवाज तर उठवणार आहे. शिवाय त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत द्यावी यातील मयतांच्या वारसांना शासकीय नोकरी दयावी याबाबत शासनाने आश्वासन दिल्याशिवाय अंत्यविधी होवू देणार नाही.
- आ भारत भालके

आमचा भिक्षेकरी समाज असून उपजीविकेसाठी देशात फिरत असतो. आता आमच्यासारख्या भिक्षेकऱ्याला चोर समजून थेट मारून टाकू लागले तर कुटूंबाचे आणि जगायचं कसे असा सरकारने अशा घटनांना आळा घालून या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करून भिक्षेकरी समाजास संरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावी.
- गोरखनाथ भोसले, हुन्नुर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com