कोयना धरणातून पाणी सोडण्यास शंभूराज देसाईंची आडकाठी; ताकारी योजना बंद करण्याची वेळ, कृष्णेचं पात्रही पडणार कोरडं?

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून हा प्रकार होत असल्याचा आरोप याआधीही झाला होता.
Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desaiesakal
Summary

कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे.

सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam) पाणी सोडण्यास पुन्हा एकदा टाळाटाळ सुरू झाली आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून (Sangli Irrigation Department) पाण्याची मागणी केली, मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्याकडून हा प्रकार होत असल्याचा आरोप याआधीही झाला होता.

यावेळी पुन्हा परिस्थिती काठावर आली असून, ताकारी उपसा सिंचन योजना (Takari Scheme) बंद करण्याची वेळ आली आहे. कृष्णा नदीत सध्या पाणी आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, मात्र उपसा सिंचन योजना चालवाव्यात एवढा साठा नाही. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहिली, तर मात्र कृष्णेचे पात्र पुन्हा कोरडे पडू शकते, अशी स्थिती आहे.

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Supreme Court : सरकारनं दिलेलं आरक्षण 'या' कारणामुळं सर्वोच्च न्यायालयातून रद्द; वक्कलिग, मराठा समाजात तीव्र नाराजी

पाटबंधारे विभागाच्या विनंतीनुसार आधी एक टीएमसी आणि पुन्हा एक टीएमसी पाणी गेल्या महिन्यात सोडले होते. आणखी दोन टीएमसी पाण्याची तातडीने मागणी होती, मात्र त्याला मान्यता दिलेली नाही. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून यामध्ये आडकाठी आणली जात असल्याचा आरोप आता उघडपणे सुरू झाला आहे.

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
Dhangar Reservation : धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून लढणार; भाजप आमदाराची उपोषणस्थळी ग्वाही

पाणी सांगलीचे, मालक साताऱ्याचे

कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे. त्यात प्राधान्याने टेंभू, ताकारी योजनांसह खासगी उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सांगलीला ३२ टीएमसी हक्काचे पाणी मिळणार आहे, मग ते कधी द्यायचे आणि कधी अडवायचे, याचा निर्णय साताऱ्याचे नेते शंभुराज देसाई का करत आहेत, असा आरोप होत आहे.

पालकमंत्री, खासदार, आमदार पुन्हा गप्प

पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर ही मंडळी या प्रश्‍नावर आधी आक्रमक होती. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी शंभुराजे देसाई यांच्याबाबत योग्य ठिकाणी बोलू, असे सांगितले होते. त्याचे काय झाले? ते आताही गप्प आहेत.

Koyna Dam Irrigation Department Shambhuraj Desai
PM मोदींच्या वाढदिनी राज्यातील 73 ऐतिहासिक तीर्थस्थळांचा होणार कायापालट; पांडवकालीन कर्णेश्वर मंदिराचाही समावेश

सलग सोडले तरी पुरेसे ठरेल पाणी

कोयना धरणातील दोन पॉवर हाऊसमधून प्रत्येकी १०५० क्युसेकने म्हणजेच एकूण २१०० क्युसेकने पाणी सोडले आणि ते सलग मे महिन्यापर्यंत चालू ठेवले तरीही ३२ टीएमसी पाणी पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग बंद करण्याचा, अडवण्याचा प्रश्‍नच येत नाही. कालवा सल्लागार समितीचे नेते या स्थितीत गोंधळ माजवत आहेत. त्याचे खापर मात्र पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांवर फुटू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com