Almatti Dam latest water storage update
esakal
बेळगाव : आलमट्टी धरणातील पाणीसाठा अजूनही समाधानकारक नाही. आलमट्टी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने भविष्यात नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली (Karnataka Almatti Dam water storage news) आहे. या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहून कोणत्याही शेतकऱ्याने खरीप पिकांची पेरणी करू नये. तसेच सध्यातरी आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले आहे, असे कृष्णा भाग्य जल निगमच्या धरण सुरक्षा विभागाने सांगितले आहे.