Anna Bhau Sathe Jayanti significance
esakal
-डॉ. नितीन रणदिवे
Anna Bhau Sathe Jayanti 2026 : मराठी साहित्याला पांढरपेशी चौकटीतून बाहेर काढून थेट झोपडपट्ट्या, शेतमजूर आणि कामगारांच्या चाळींत आणून उभे करणारे युगपुरुष म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. कोणतेही औपचारिक शिक्षण न मिळताही केवळ अनुभव, सूक्ष्म निरीक्षण आणि अद्वितीय प्रतिभेच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यात एक नवा इतिहास रचला. त्यांची वैचारिक धारणा ही साम्यवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी तत्त्वज्ञानाच्या समन्वयावर अधिष्ठित होती.