पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या आंदोलनात सहभागी होऊ - आण्णा हजारे

aandhalgaon
aandhalgaon

आंधळगाव - तालुक्यातील ४५ गावांना निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कायमस्वरुपी कोरडवाहू गावांचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनाने दखल घेतली नाही. तर या गावांच्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिले.

याबाबत समाजसेवक आण्णा हजारे यांची सभापती प्रदिप खांडेकर, अंकुश पडवळे, सुभाष नरोडे, बापूसाहेब मेटकरी, गुलाब थोरबोले, भारत गरंडे, बाळासाहेब लेंडवे, अनिल खांडेकर, दत्तात्रय खांडेकर आदिनी भेट घेतली. ४५ गावांना कायमस्वरुपी कोरडवाहू गावांचा दर्जा द्यावा, जनावरांना तात्काळ चारा दावणीत उपलब्ध करावा, शेतीतील फळबागा वाचविण्यासाठी व खरिप-रब्बी च्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा व ४५ गावांच्या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी भेट घेतली. 

यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, निव्वळ पावसावर अवलंबून असनाऱ्या गावांची कायमस्वरुपी कोरडवाहू गावांना दर्जा देण्याची मागणी रास्त आहे. सदर गावावर दुष्काळी योजनातही अन्याय होतो त्यामुळे या गावांच्या मागण्याबाबत राज्य सरकारकडे त्वरित मागणी करणार आहे. जर शासानाने दखल घेतली नाही तर ४५ गावांच्या आंदोलनात साहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. 

"जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निव्वळ पावसाच्या पाण्यावरील गावाना कोरडवाहूचा दर्जा मिळणेबाबात  सध्या जनावरांना चारा नाही शासनाने तात्काळ उपलब्ध करणे गरजेचे आहे. फळबागा सुकू लागल्या आसून निव्वळ पावसावर अवलंबून असनाऱ्या गावाना वेळीच मदत न केल्यास पशुधन व शेती उध्वस्त होईल यासाठीच्या आंदोलनात उतरण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com