उद्या राळेगणची चुल पेटणार नाही...

उद्या राळेगणची चुल पेटणार नाही...

राळेगणसिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने उद्या राळेगण सिद्धी पुर्ण गाव उपोषण करणार असुन कोणत्याही घराची चूल पेटणार नाही असा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार लोकपाल व लोकायुक्त ड्राफ्ट जसाच्या तसा स्वीकारला आहे त्याबाबत हजारे यांचे समाधान झाले असुन शेतक-यांच्या काही प्रश्नाबाबत असमाधानी आहेत त्याबाबत उद्या पुन्हा चर्चा करणार आहोत त्यानंतर उपोषणाची सांगता होऊल अशी अशा आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले असले तरी चर्चा निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांचे उपोषण पुढेही सुरू राहणार आहे.

अण्णा हजारे यांची भामरे व महाजन यांच्याची सुमारे तीन तास चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, अण्णा हजारे लोकपाल व लोकायुक्त कायद्याबाबत समाधानी झाले असुन त्यांच्या 95% मागण्या पुर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला आहे. फक्त स्वामीनाथन आयोग लागु करणे कृषीमुल्य आयोगला स्वत्यता देणे या प्रश्नांबाबत हजारे असमाधानी आहेत. तसेच शेतीमालला उत्पादन खर्चाच्या दिडपट भाव मिळाला पाहीजे ही हजारे यांची मागणी असुन यात कपाशी, मका, तुर या शेतीमालाला सरकारने चांगला हमीभाव जाहीर केला आहे. भाजीपाला व काही शेतीमालच्या बाबतीत ते झालेले नाही याबाबतीही आज चर्चा करून तो ही प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न राहील असेही महाजन म्हणाले.

लोकपाल लोकायुक्त च्या नियुक्तीसाठी हजारे यांच्या मतानुसार निवड समिती नियुक्त करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तच्या कक्षेस घेण्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन पाठींबा म्हणुन काढण्यात आलेल्या मोर्चाचे निवेदन स्वीकारन्यासाठी जिल्हाधिकारी मोर्चाला सामोरे न आल्याने त्यांचा आजच्या ग्रामसभेत निषेध करण्यात आला व मोर्चात पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी पाणी वाटप केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आले.

यापुढे कुढल्याही मोर्चाला सामोरे जाण्यासाठी थेट सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी मोर्चामध्येच आले पाहीजे खुर्चीत बसुन निवेदन स्विकारन्याचा जो प्रोटाकॉलचा नियम आहे तो रद्द करा येथुन पुढील काळात मोर्चेकरांचे निवेदन स्विकारन्यासाठी अधिकाऱ्यांनी मोर्चात येऊन ते स्वीकारले पाहीजे अशी मागणीही आपण ह्या आंदोलनात करणार आहोत. जनता ही मालक आहे व अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत असे हजारे यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com