आटपाडीचा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार तब्बल आठ महिन्यानंतर सुरू

bajar
bajar

आटपाडी : पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आणि एकाच बाजारात सव्वा कोटीवर उलाढाल होणारा आटपाडीचा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार तब्बल आठ महिन्यानंतर सुरू झाला. यामुळे कोट्यावधीची उलाढाल सुरु होऊन शेतकर्‍यासह व्यापारी, वाहन चालक आणि यावर अवलंबून असलेल्या अनेकांचा आर्थिक गाडा पुन्हा गती सुरु झाला.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आटपाडी चा शेळ्या मेंढ्या चा बाजार कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद होता. यामुळे शेळी पालक आणि मेंढपाळ यांच्याबरोबरच व्यापारी, वाहन चालक आणि बाजारावर अवलंबून असलेले इतर व्यवसायीकाचा आर्थिक गाडा पूर्ण थांबला होता. अनेक शेतकऱ्यांनी अडचणीमुळे जो दर मिळेल त्या दराला घरीच दलालांना शेळ्या मेंढ्याची विक्री केली. यामुळे कमी दर मिळाले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुन्हा बाजार सुरू झाला. दर शनिवारी भरणाऱ्या या बाजारात शंभर ते सव्वाशे कोटीची उलाढाल होते आणि ती पहिल्यात बाजारात झाली. बाजारात दर्जेदार माणदेशी, उस्मानाबादी आणि माडग्याळ जातीचे शेळ्या-मेंढ्या, बकरे बोकड विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात.

या बकरी आणि बोकडाच्या मटणाला राज्यभरातून मागणी असल्यामुळे दोनशे किलोमीटर अंतरावरून व्यापारी खरेदीसाठी आले होते. आठ महिन्यानंतर बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढ्या आणि बकरे- बोकड याचा बाजार पुन्हा सुरू झाला. मोठा प्रतिसादही मिळाला. पहिल्याच बाजारात सव्वा कोटीवर उलाढाल झाली. यामुळे शेतकरी आणि व्यापार यांचा आर्थिक गाडा गतीने सुरू झाला. शिवाय बाजारावर अवलंबून असलेले वाहन चालक-मालक, हातगाडे, वडापाव आणि चहाचे गाडे, बनावरासाठी लागणारे दोर, कनडे, चाळ विक्रेते यांचाही आर्थिक गाडा सुरू झाला आहे. याच बाजारात अनेकांनी विक्रीसाठी देशी कोंबड्या आणि कोंबडी विक्रीसाठी आणले होते. त्यालाही चांगला भाव मिळून मोठी विक्री झाली. यामुळे गावगाड्यातील शेतात राबणाऱ्या आणि मेंढपाळांना चांगला दिलासा मिळाला आहे.

खरेदीसाठी येणारे व्यापारी

आटपाडी बाजारातील बकरे आणि बोकडाच्या मटणाला राज्यभरातून मोठी मागणी असल्यामुळे सांगली, कोल्हापूर, विजापूर, गोवा, पुणे, सातारा, कराड या भागातून प्रत्येक बाजारात व्यापारी मोठ्या संख्येने येतात. चांगल्या दर्जाचा म** येत असल्यामुळे मोठ्या संख्येने व्यापारी बाजारात येतात. त्यामुळे ्यापार्‍यांच्या बोली लावून शेळ्या-मेंढ्या आणि बोकड बकऱ्याची खरेदी विक्रीचे रोखीने व्यवहार होता. यामुळे फसवून खी होत नाही.सरासरी 150 ते 180 चार चाकी पिकप गाड्या गच्च भरून माल बाहेर जातो. पहिल्या बाजारातच 175 वर गाड्या भरून बाहेर गेल्या. भविष्यात बाजारातील शेळ्या-मेंढ्या आणि बकरे बोकडाची थेट वजनावर किंमत निश्चित करून खरेदी-विक्री व्यवहार करण्याचे बाजार समितीचे नियोजन आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com