सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनावरांचे चाऱ्यासाठी हाल

magalwedha.jpg
magalwedha.jpg

मंगळवेढा : सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनावराचे चाऱ्यासाठी हाल सुरू असून मुक्या जनावराचे जतन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनाच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील येड्राव येथे तिरूपती कंन्ट्रक्शन पुणे यांच्या सौजन्याने व मायाक्का दुध संस्थेच्या माध्यमातून स्वखर्चाने सुरू केलेल्या जनावराच्या छावणीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रकाश येलपले, दौलत माने ,जालीदर माने ,भुजंगराव पाटील ,श्रीधर काळे ,दादासाहेब कोळेकर,संजय पाटील , दत्तात्रय कोळेकर ,पंडीत कोळेकर, अमोल माने ,आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले की,  उन्हाळ्यातील चारा टंचाई यंदा दिवाळीपासून जाणवू लागली.त्यामुळे तालुक्यातील सध्या 94 हजार मुक्या जनावराचे चाय्रासाठी हाल सुरू आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाल्याने चाऱ्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्ते मात्र ,जागा वाटपाच्या तडजोडीत अडकले आहेत. साडेचार वर्षे एकामेकावर आरोप करणारे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले आहेत. पण मुक्या जनावरासाठी मात्र, येवून त्यासाठी सोयसुविधा करण्याबाबत बोलत नाहीत. आघाडी सरकारने दिलेल्या अनुदानापेक्षा प्रति जनावर कमी अनुदान देणार शासनाने जाहीर केल्यामुळे प्रस्ताव देण्यासाठीही कोण तयार होईना. या छावणीत आज पहिल्या दिवशी 200 पेक्षा अधिक जनावरे दाखल झाली.

 
''सध्या दुष्काळी तालुक्यात जनावराचे हाल सुरू असून त्याच्या चाय्राची सोय व्हावी. म्हणून सध्या स्वखर्चात सुरू केली. शासन सुरू करेन पर्यंत चालू ठेवणार आहे.''
- सुरेश पाटील, छावणी चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com