बंगळूर : सध्या असलेल्या निर्बंधांची मुदत संपुष्टात आल्यानंतर २१ जूननंतर राज्यात लॉकडाउनवरील (lockdown) निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय शनिवारी (ता. १९) घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B.S. yediyurappa) यांनी सांगितले. राज्यातील परिस्थिती सुधारत आहे. भविष्यात तिसरी लाट येण्याचीही शक्यता असली तरी आम्हाला थोडी शिथिलता आणावी लागेल. शनिवारी संध्याकाळी बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ. असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार बेळगावसह ११ जिल्ह्यांमध्ये (belguam distritct) शिथिलतेची घोषणा करू शकते. जिथे अजून लॉकडाउन उपाययोजना सुरूच आहेत. तर लोकांच्या हालचाली आणि व्यवसाय सुरू करण्याच्यादृष्टीने उर्वरित १९ जिल्ह्यांत २१ जूनपासून आणखी शिथिलता जाहीर केली जाऊ शकते. गेल्या आठवड्यात सरकारने कोविड -१९ मधील लॉकडाउनला २१ जूनपर्यंत वाढीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली होती.
२१ जूनपर्यंत नागरिकांना सकाळी ६ ते सकाळी १० दरम्यान आवश्यक वस्तू खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली. उर्वरित १९ जिल्ह्यांत १४ जूनपासून काही सवलती जाहीर करण्यात आल्या असून त्याद्वारे सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत दुकाने चालू ठेवण्यास आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांची हालचाल सुरू करण्यात आली.
कोविड -१९ कर्फ्यू रोज संध्याकाळी ७ ते सकाळी ५ या वेळेत आणि आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी संध्याकाळी ७ ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत आहे. चिक्कमंगळूर, शिमोगा, दावणगेरे, म्हैसूर, चामराजनगर, हसन, दक्षिण कन्नड, बंगळूर ग्रामीण, मंड्या, बेळगाव आणि कोडगू असे ११ जिल्ह्यांत कडक बंदोबस्ताचे उपाय सुरू आहेत. सरकारने सुरुवातीला २७ एप्रिलपासून १४ दिवस निर्बंध जाहीर केले होते. परंतु त्यानंतर कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने १० ते २४ मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाउन लागू केले. लॉकडाउन परिणाम आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचा हवाला देऊन ते पुन्हा ७ जूनपर्यंत आणि नंतर पुन्हा १४ जूनपर्यंत वाढविण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.