पंढरपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी तिजोरी खाली करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत माढा, बारामती आणी सांगलीसह राज्यात महायुती 40 जागा जिंकेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला.
दुष्काळी पहाणी दौऱ्याच्या निमित्ताने आज मंत्री जानकर यांनी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील जनावरांच्या छावणीला भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्यात एकूण 1 कोटी 12 लाख पशुधन आहे .दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने आतापर्यंत 1 हजार 248 जनावरांच्या छावण्या सुरू केल्यात आहेत. यामध्ये 8 लाख जनावारांची चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात सांगोला तालुक्यात सर्वाधिक 77 छावण्या सुरू असून त्यामध्ये 77 हजार जनावरे दाखल झाली आहेत.
पशु पालकांच्या मागणीनुसार प्रती जनावर॔ 15 ऐवजी आता 18 किलो चारा देण्यात येणार आहे. तर जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतलेले सहा रूपये देखील परत करण्यात येणार आहेत. या शिवाय जनावरांचा विमा पाॅलिसी देखील सरकार काढणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले.
राज्यातील लोकसभेचा निकाल काय असेल असे विचारले असता, माढा, बारामती आणि सांगलीसह किमान 40 जागा भाजप शिवसेना जिंकेल, असा आत्मविश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.