युतीपेक्षा दुष्काळ महत्तवाचा - आदित्य ठाकरे

aaditya-tackrey
aaditya-tackrey

माढा (सोलापूर) - युतीपेक्षा दुष्काळ महत्तवाचा असल्याचे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माढयातील धावत्या भेटीत मंगळवारी (ता. १२) दुपारी सांगितले. 

मंगळवारी दुपारी येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोरील पटांगणात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चारा वाटप व पाण्याच्या टाक्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी व महिलांच्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी कर्जमाफी झाली का नाही याबाबतची माहिती घेतली. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले की वातावरण बदलामुळे सध्या आपल्याला आक्टोबर महिन्यांपासून दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे सध्या निवडणूकांपेक्षाही दुष्काळ हातळणे महत्तवाचे आहे. शिवसेना भाजप युतीपेक्षाही दुष्काळ महत्तवाचा असल्याचे त्यांनी सांगितले‌. यावेळी खासदार रवी गायकवाड, आ. नारायण पाटील, प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com