दुष्काळातही निकषांवर बोट

Water
Water

मागणी करूनही गावांना मिळेना चारा छावणी अन्‌ टॅंकर
सोलापूर - पाण्याअभावी शेतात उभे पीक नाही अन्‌ चारा व पाण्याअभावी जनावरे उपाशी मरत आहेत. दुष्काळाची मदत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरही केले आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील २७ हजार ३७२ गावांमध्ये तीव्र दुष्काळ पडला असून, गावोगावी टॅंकर व चारा छावण्यांची मागणी केली जात आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांकडून निकषांवर बोट ठेवले जात आहे.

राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी तर जनावरांची पाणी अन्‌ चाऱ्यासाठी वणवण सुरू आहे. दुसरीकडे दुष्काळाने बाधित ६७ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २७ लाख शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही मदत पोचलेली नाही, असे मदत व पुनवर्सन विभागातील सूत्रांनी सांगितले. तसेच सोलापूरसह राज्यातील ४७ लाख जनावरांना पुरेसा चारा व पाणी मिळत नसल्याचेही पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अशी परिस्थिती असूनही शासकीय नियमांच्या पलीकडे जाता येत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळाच्या शेवटच्या टप्प्यात मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी दुष्काळ पहाणी दौरे सुरू केल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com