सोलापूर जिल्ह्यामध्ये वीजपुरवठा वारंवार "ट्रीप'

Electricity
Electricity

सोलापूर - महावितरणच्या वतीने शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. पाच-दहा मिनिटांनी वीजपुरवठा "ट्रीप' होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा कधी सुरू होतो व कधी बंद होतो, याची माहितीच शेतकऱ्यांना होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याची मागणी वाढली असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. मागणी वाढल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा दोन तासांनी कमी केला आहे. पूर्वी दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. तो आता सहा तासांवर आणला आहे. मात्र, तोही नियमितपणे दिला जात नाही. सहा तासांमध्येही चार व दोन तास असे विभाजन केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरू होतो, हेच शेतकऱ्यांना कळत नाही. वीजपंप सुरू केल्यानंतर पाच मिनिटांतच वीजपुरवठा "ट्रीप' होत असल्याने विहिरीतून आलेले पाणी वाफ्यामध्येही जात नसल्याचे शेतकरी सांगतात. रात्रीच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रकही पूर्णपणे बदलले आहे.

रात्रभर द्यावे लागणार पिकाला पाणी
यापूर्वी वीजपुरवठा रात्री 12 वाजता सुरू होऊन तो सकाळी दहा वाजता बंद होत होता. त्यामुळे पहाटेपासून पिकांना पाणी देणे सोईचे होते. मात्र, नव्या वेळापत्रकाप्रमाणे वीजपुरवठा रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी सुरू होऊन सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पिकाला पाणी देत बसावे लागणार आहे. जिल्ह्यात पाऊस नसल्याने विजेची मागणी वाढल्याचे कारण सांगून महावितरणचे अधिकारी मोकळे होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com