सांगली : केंद्राने शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरमहा पाचशे रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. केंद्र नववा हप्ता जमा, मोठा गाजावाजा गेला महिनाभर केल्याचे सांगितले जाते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पात्र ४ लाख ६५ हजार ३१६ पैकी केवळ १ लाख २७ हजार २०० शेतकऱ्यांना नवव्या हप्त्याची रक्कम बॅंक खात्यावर जमा झाली आहे.
केंद्राने शेतकरी सन्मान योजना गाजावाजा करीत सुरू केली. तीन महिने जे शेतकरी वंचित आहेत. त्यांचीही नोंदणी होत नाही, अशी चर्चा आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार ३१६ शेतकरी पात्र आहेत. यापैकी योजनेचा पहिला हप्ता ४ लाख ३१ हजार ७१ जणांना मिळाला.
मंजूर शेतकऱ्यांच्या तुलनेत ९२.६४ जणांना पहिला हप्ता मिळाला. दुसरा हप्ता ४ लाख २२ हजार ६२०, तिसरा हप्ता ४ लाख ३८ हजार २९४, चौथा हप्ता ३ लाख ८८ हजार ६४० शेतकऱ्यांना, पाचवा हप्ता ३ लाख ९५ हजार ८०४, सहावा हप्ता ३ लाख ६९ हजार ७५८, सातवा हप्ता २ लाख ८५ हजार २५२ तर आठवा हप्ता २ लाख ७० हजार ६५२ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेवटचा हप्ता केवळ १ लाख २७ हजार २०० शेतकऱ्यांना मिळाला. त्याचा अर्थ २७ टक्के शेतकऱ्यांना नववा हप्ता मिळाला.
तालुकानिहाय लाभार्थी
मिरज- ५९, ५६३
कवठेमहांकाळ- ३२,३२८
तासगाव- ४९, ५५७
जत- ७७,३९४
पलूस- २७,४९४
आटपाडी- ३५,१४५
कडेगाव- ३९,९७५
विटा- ३०,२१०
शिराळा- ३९,७३२
वाळवा ७३,९१८
केंद्राने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देऊन मोठी मदत दिल्याचा आव आणला जात आहे. दुसरीकडे शेतमालाची लूटच सुरू आहे. हा निधी न देता भावांतर योजनेसाठी हा निधी राखीव ठेवावा. जेव्हा हमी दर ठरविला जातो, तेव्हा शेतमालाला हमी दर देण्यासाठी हा निधी वापरला तर शेतकऱ्यांना आनंद मिळेल. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सन्मान ठरेल.
- महेश शिंदे, कवलापूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.