कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी देण्याच्या अमिषाने हजारो शेतकऱ्यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
जानेवारी 2018 पासून या भागातील शेतकऱ्यांनी या कंपनीशी करार केले. करार करताना 75 हजार रूपये, त्यानंतर एक लाख रूपय भरून घेऊन कंपनीने करार केले. या करारानुसार कंपनीकडून एक दिवसाचा व तीन महिन्याचा कडकनाथ पक्षी, पशुखाद्य, भांडी, वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी संगोपन केलेल्या पक्षाची अंडी व पक्षी परतावा म्हणून द्यायचे होते, त्या बदल्यात कंपनीकडून रोख स्वरूपात पैसे दिले जाणार होते. पण त्यानंतर कंपनीने करारात बदल करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी केल्या या मागण्या....
या मागण्या मान्य न झाल्यास सदर कंपनीवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.