त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा : उदयनराजे भाेसले

त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा : उदयनराजे भाेसले

सातारा : वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विचार करता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धरणाचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. सातारकरांना भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही पाण्याचा अपव्यय करावा. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालिकेला दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणी पातळीचा आढावा खासदार उदयनराजे यांनी आज (सोमवारी) सकाळी पालिकेचा पाणीपुरवठा विभाग व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विचार करता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या धरणाचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. सातारकरांना भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही पाण्याचा अपव्यय करावा. कास तलावात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालिकेला देण्यात आल्या आहेत.

कासबरोबरच अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना ही केल्या आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com