एकरकमी 'FRP'शिवाय स्वाभिमानी शांत बसणार नाही

एकरकमी 'FRP'शिवाय स्वाभिमानी शांत बसणार नाही
Summary

ऊसदर आंदोलनाची ठिणगी कर्नाटकातूनच पडणार आहे.

खडकलाट : निती आयोग, कृषी मूल्य आयोगाने साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी अडीच महिन्यात द्यावी, अशी शिफारस केली आहे. त्यानुसार एकरकमी घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सोमवारी (27) गळतगा (ता. निपाणी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी होसपाल बोके होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा थकीत एफआरपीचा मुद्दा केंद्रापर्यंत गेला. आयोगाने ऊसतोडीनंतर १४ दिवसांत कारखानदारांनी ऊस उत्पादकांची ६० टक्के एफआरपी द्यावी आणि त्यानंतर १ महिन्यात २० टक्के देण्यास सांगितले. उर्वरीत २० टक्के रक्कम एका महिन्यात देण्याची शिफारस केली आहे. मात्र महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी त्यात मनमानी केली. त्यामुळे स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच शेतकरी हितासाठी विविध उपाययोजना सूचवल्या आहेत. यंदाची ऊस परिषद दसरा झाल्यानंतर होईल. ऊसदर आंदोलनाची ठिणगी कर्नाटकातूनच पडणार आहे. त्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

एकरकमी 'FRP'शिवाय स्वाभिमानी शांत बसणार नाही
विषय हार्ड! राधानगरीत रंगली चिखलगुठ्ठा स्पर्धा

स्वाभिमानीचे कर्नाटक राज्य प्रभारी आदिनाथ हेमगिरे म्हणाले, वीस वर्षापासून स्वाभिमानीची चळवळ सुरु आहे. त्यात शेतकरी समृध्द झाला आहे. त्याचे श्रेय राजू शेट्टी यांना जाते. सीमाभागातील शेतकऱ्यांनी चळ्वळीला प्रतिसाद द्यावा. निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी, राजू शेट्टींनी कर्नाटक राज्य पातळीवर रयत संघटनेचे नेतृत्व करण्याची मागणी केली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन्. आय. खोत यांनी एकीने चळवळीला धार देण्याचे आवाहन केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे किरण माणगावे, राजू उपाध्ये, राजू होळीकोप्पे, बाबासाहेब तारदाळे, उदय चौगुले, कुमार मरबिल्ले, विद्यासागर चेंडके, पोपट नांदणीकर, अभय पाटील, शिवू पाटील, प्रकाश तारदाळे, तात्यासो केस्ते, नायकू खोत, पिंटू चौगुले, उमेश भारमल, प्रवीण सुतळे, संजू पाटील यांच्यासह गळतगा, बेडकहाळ, भोज, शिरदवाड, निपाणी, सिदनाळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते. निपाणी तालुका स्वाभिमानीचे उपाध्यक्ष सुभाष चौगुले यांनी स्वागत केले. रावसाहेब खोत यांनी आभार मानले.

एकरकमी 'FRP'शिवाय स्वाभिमानी शांत बसणार नाही
'विरोधकांनी नाकारले तरी 'चिपी'चे संपूर्ण श्रेय केंद्रीयमंत्र्यांनाच'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com