प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांना ‘भारतरत्न’ द्या

राजू शेट्टी - जैन अधिवेशनात लक्ष वेधले
शांतिसागर महाराज
शांतिसागर महाराजSakal

सांगली - जैन समाजाचे प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागर महाराजांचे देश आणि समाजाच्या हितात मोठे योगदान आहे. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दक्षिण भारत जैन सभेत दोन्ही सरकारांचे लक्ष वेधले.

सन १९२४ साली श्री शांतिसागर महाराजांना प्रथमाचार्य म्हणून उपाधी मिळाली. ते ठिकाण होते मिरज तालुक्यातील समडोळी गाव. त्यामुळे समडोळी येथे सन २०२४ मध्ये या घटनेचा शताब्दी महोत्सव मोठ्या धडाक्यात झाला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्री. शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, ‘‘शांतिसागर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला होता. देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे समडोळी येथे त्यांचा उत्सव झाला पाहिजे. समडोळीकर वर्षभर तेथे कार्यक्रम करतील. त्याला सरकारने मदत करावी.’’

पालकमंत्री जयंत पाटील यांनी समडोळी गाव माझ्या मतदार संघात येत असल्याचे सांगून राजू शेट्टी यांची ही मागणी उचलून धरली. ते म्हणाले, ‘‘हा कार्यक्रम भव्य-दिव्य करू आणि राजू शेट्टी तुम्हाला जरूर बोलवू.’’ यावेळी शेट्टी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण संस्थांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिला. त्यामुळे शिक्षण संस्थांचे रोस्टर बंद झाले, मात्र त्याचा फायदा समाजाला मिळू द्या. किमान १५ टक्के कर्मचारी भरती पैसे न घेता केली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com