दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - विजयकुमार देशमुख

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून, दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते. 

त्यावेळी त्यांच्यासमवेत प्रशांत परिचारक, जिल्हा दुध संचालक औदुंबर वाडदेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष राजेन्द्र सुरवसे, शिवानंद पाटील, युन्नुश शेख, मधुकर चव्हाण, मल्लिकार्जून शिरोळे
स्वाती दोडके, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार आप्पासाहेब समींदर, तालुका कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, गटविकास अधिकारी राजेन्द्रकुमार जाधव आदीसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व पदाधिकारी व ग्रामस्थ या दौय्रात उपस्थित होते. यावेळी त्यानी आंधळगाव, शिरसी, गोणेवाडी, नंदेश्वर, सिध्दनकेरी, भाळवणी, मुंढेवाडी, ब्रम्हपुरी आदी गावात शेती, पिण्याचे पाणी, रोहयोची कामे, जनावराचा चारा आदीची पाहणी केली. 

पालकमंत्री देशमुख शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, मागणी प्रमाणे मजुराच्या हाताला काम, पिण्याचे पाणी, जनावराला चारा आदी उपाय योजना करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असतील. दुष्काळ जाहीर केंद्र शासनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे म्हणाले यावेळी लक्षी दहिवडी रस्त्यालगतच्या शेतीची पाहणी केली शेतक-यानी पेरलेल्या बियांनाना कोंभ उगवून जाग्याला जळून गेलेले दाखवले. पिण्याच्या पाण्यासाठी आंधळगांव प्रदेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी. याशिवाय जनावराच्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सुरू करण्यात यावेत. चालू वर्षाच्या रब्बी व खरीप दोन्ही हंगामाची पिके शेतक-यांना घेता आलेली नसल्याने तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध नसल्याचे शेत-याकडून सांगण्यात आले. जनावरांना तालुक्यात चारा नसल्याने चारा डेपो तयार करून डेपो मार्फत चारा पशु पालकांना पुरवण्यात यावा अशी मागणी केली. पशुपालकानी चारा छावणी ऐवजी चारा डेपो मागणी करण्यात आली. पंचायत समितीकडून विहीरी, रस्तेच्या कामाची मागणी करण्यात आली.

घरकुलाच्या माध्यमातून रोजगार दिला असून अन्य कामेही लवकर सुरू केली असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.तर भोसे प्रादेशिक मधून वाड्यावस्त्या वंचीत असून त्याचा समावेश करण्याची मागणी केली.
याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांनी इतर समस्या आ.परिचारकच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.त्यानीही रोजगार, पाणी, चारा यास प्राधान्य देण्यात येणार असून शासनाच्या माध्यमातून दुष्काळी मदत मिळवण्यासाठी पालकमंत्र्याच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com