

Government distributes ₹150 crore relief to 42,000 rain-hit farmers in Sangli; 25,000 hectares affected by heavy rains.
Sakal
सांगली: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या ४२ हजार २८८ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून १५० कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५००, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये, तर जिरायत पिकांसाठी हेक्टरी ८ हजार याप्रमाणे ही मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात या सानुग्रह अनुदान रकमेचे वाटप सुरू झाले आहे. खानापूर, आटपाडी, जत आणि तासगाव तालुक्यात सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे.