इचलकरंजीत मानवी साखळीतून "आय विल व्होट' चा नारा

इचलकरंजीत मानवी साखळीतून "आय विल व्होट' चा नारा

इचलकरंजी - जनमनाचा पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे, अशा घोषणा देत हजारो तरूणांनी आज मतदानाबाबत जागृती केली. मानवी साखळीतून "आय विल व्होट' चा नारा देत इचलकरंजीवासियांना लोकशाही सदृढ करण्यासाठी या युवकांनी मतदान करण्यासाठी हाक दिली. सकाळ माध्यम समूह आणि इचलकरंजी निवडणूक प्रशासन यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रोटरी क्‍लब ऑफ इचलकरंजी व क्रेडाई इचलकरंजी यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

सकाळ व निवडणूक प्रशासनाने आवाहन केल्यानंतर या उपक्रमात अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. येथील एएससी व कन्या महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळपासूनच या उपक्रमाची तयारी सुरू होती. सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. एनसीसी, एनएसएसच्या मुलांच्या विविधरंगी गणवेशात डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलचा परिसर फुलून गेला होता.

सुमारे 1 हजारहून अधिक युवा मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम साळुंखे हायस्कूलच्या मैदानावर पार पडला. स्वागत व प्रास्ताविक सकाळचे बातमीदार संजय खूळ यांनी केले. कार्यक्रमास पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डीकेएएससी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, आक्काताई पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, रोटरीचे सचिव प्रकाश रावळ, सत्यनारायण धूत, क्रेडाईचे अध्यक्ष सय्यद गफारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा. मिलिंद दांडेकर यांनी मतदान करण्याबाबत शपथ दिली. त्यानंतर भव्य मानवी साखळीस सुरवात झाली. या मानवी साखळीने शहरात प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात मतदान जागृतीबाबत उपक्रम झाला. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमाने एएससी महाविद्यालय ते शिवाजी पुतळा चौक दुमदुमून गेला होता. यामध्ये व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यानंतर गंगामाई ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्राचार्या सुप्रिया गोंदकर यांनी निवडणूकीतील मतदानाचे महत्व तरूणींना सांगितले. या ठिकाणी महाविद्यालयाच्या तरूणींनी भव्य अशी "आय विल व्होट' या शब्दाची प्रतिकृती तयार केली होती.

""भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश असून निवडणूका हा देशातील सर्वात मोठा सण आहे. आपले निर्णय घेणारा प्रतिनिधी शासनात असावा यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपले नातेवाईक, पालक, नागरिक, शेजारी यांच्याकडून मी मतदान करणार असे संकल्पपत्र प्रत्येकाने भरून घेतले पाहिजे. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.''
डॉ. विकास खरात

निवडणूक निर्णय अधिकारी, इचलकरंजी विधानसभा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com