आताचे सरकार अधिक नालायक : राजू शेट्टी

Raju Shetty
Raju Shetty

कोल्हापूर : ऊस दरात तोडगा काढण्याऐवजी सरकारला शेतकऱ्यांना रक्तरंजित झालेले किंवा त्यांची फुटलेली डोकी पाहायची आहेत. ऊस दराबाबत आधीच सरकार नालायक होते, आताचे सरकार अधिक नालायक असल्याची टिका खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, साखर कारखाने वेळेत सुरू झाले पाहिजेत. ऊस तोड रोखल्यानंतर शेतकऱ्यांचेचे नूकसान होणार आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. पण, शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर देवून कारखाने सुरू करणार असतील तर ते चुकीचे आहे. शेतकऱ्याला संघर्षाशिवाय आत्तापर्यंत काहीही मिळालेले नाही. निसर्ग, रोगराई, खळ्यावरच धान्य लुटणारे आणि आता सरकार सोबत संघर्ष करावा लागत आहे.

वास्तविक ऊस दराबाबत सरकारने मध्यस्ती करून तोडगा काढला पाहिजे होता. सरकार यामध्ये लक्ष देत नाही. कारण त्यांना शेतकऱ्यांची डोकी फुटलेली बघायची आहेत. गेल्यावर्षीपर्यंत शेतकऱ्यांनीही कारखान्यांना सांभाळून घेतले आहे. कायद्यात नसतानाही एफआरपीची रक्कमही पहिल्यांदा 80 व नंतर 20 टक्के घेतली आहे. हा शेतकऱ्यांचा मोठेपणा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com