Sangli flood risk due to Almatti Dam
esakal
सांगली : आलमट्टी धरणात करारापेक्षा अधिक पाणी अडविल्यामुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा नदीकाठच्या भागावर महापुराचे संकट पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत (Sangli flood risk due to Almatti Dam) आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारवर पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दबाव आणावा आणि धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी आज केली.