

BJP and Jansurajya leaders review
sakal
महापालिका आणि नगरपरिषदेत चांगले यश मिळवलेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपला जिल्ह्याच्या दोन तालुक्यांत एकही जागा घेता आली नाही, तर दोन तालुक्यांत उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली नाही. याचे पक्षाच्या नेतृत्वाने चिंतन करण्याची गरज आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १४ जागा मिळाल्या होत्या.